गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !

‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.

सरकार को पैसे की आवश्यकता है और लोगों कों शराब पीनी हैं । इसलिए शराब बिक्री वैध करें ! – अभिनेता ऋषि कपूर

सरकार ऐसे लोगों पर कार्रवाई करें !

अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवणार्‍यांना ‘आतंकवादी’ ठरवणार !

अमेरिकेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने केलेल्या विविध नियमांकडे नागरिक दुर्लक्ष करत असून त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकेने आता नवा नियम लागू केला आहे. अमेरिका ज्या प्रमाणे याकडे गांभीर्याने पहाता आहे, ते पहाता भारतियांनी अधिक सतर्क होणे आवश्यक आहे !

विदेशांतून आलेल्या सर्वांची पडताळणी झालीच नाही ! – मंत्रीमंडळ सचिव राजीव गऊबा

गेल्या २ मासांत विदेशांतून १५ लाख नागरिक भारतात आले; पण सर्वांची कोरोनाची पडताळणी झालेली नाही. कोरोनाची पडताळणी केलेल्यांचा अहवाल आणि एकूण प्रवाशांची संख्या यांत मोठी तफावत आहे, अशी माहिती मंत्रीमंडळ (कॅबिनेट) सचिव राजीव गऊबा यांनी दिली.

कोरोनामुळे अमेरिकेत होऊ शकतो ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू ! – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर कोरोनाचे केंद्र बनले आहे. प्रतिदिन येथे बाधित आणि मृत्यू झालेल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. – इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक अँड इव्हॅल्यूऐशन

भारतात अडकलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना ‘एअरलिफ्ट’ करणार ! – अमेरिका

भारतात दळणवळण बंदी घोषित झाल्यानंतर भारतातून विदेशात जाणार्‍या विमानांची उड्डाणेे रहित करण्यात आली आहेत. त्यामुळे नवी देहली, मुंबई यांसह काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अमेरिकी नागरिक अडकले आहेत.

भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये अंत्यविधी थांबवल्याने शवागारात मृतदेह ठेवायला जागा नाही !

कोरोनामुळे युरोपातील इटली आणि स्पेन या देशांत प्रतिदिन मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तेथे रुग्णालयांत भरती होण्यापूर्वीच अनेक जणांचा मृत्यू होत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.

शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पोलिसांना चहापान

जिवाचे रान करून सेवा बजावणार्‍या उचगाव फाटा, उचगाव ‘हायवे ब्रीज’, तावडे हॉटेल चौक परिसरातील कामावर असणार्‍या पोलिसांना, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना शिवसेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चहापान देण्यात आले.