दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम !
हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

नवी देहली – देशात कोरोनामुळे लागू असलेल्या दळणवळण बंदीमुळे हिंदूंची मंदिरेही बंद आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये येणारे अर्पणही जवळपास बंद झाले आहे. याचा परिणाम मंदिराच्या खर्चावर होत आहे. यामुळे मंदिरांना बचतीतूनच खर्च भागवावा लागत आहे.

१. श्री वैष्णोदेवी मंदिर खर्च भागवण्यासाठी आता ऑनलाईन देणग्या स्वीकारण्याच्या पर्यायांचा विचार करत आहे.
२. शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराला गेल्या २ मासांत अडीच कोटी रुपयांच्या ऑनलाईन देणग्या मिळाल्या. मंदिराच्या ६ सहस्र कर्मचार्यांना एप्रिल मासाचे वेतन देण्यासाठी मुदत ठेवी मोडून त्यांतून पैसे द्यावे लागले. मंदिराचे २ सहस्र ५०० कोटी रुपये मुदत ठेवींच्या रुपात अधिकोषात आहेत.
३. श्री तिरुपती देवस्थानाच्या अनुमाने २२ सहस्र कर्मचार्यांचे वेतन, देखरेख आणि सुरक्षा यांवर प्रतिमास ११० कोटी रुपये खर्च येतो. हा खर्च भागवण्यासाठी आता मुदत ठेवी मोडून किंवा सोन्याच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा विचार देवस्थान करत आहे.
४. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या देणग्यांमध्ये गेल्या २ मासांत ९० टक्के घट झाली आहे. मंदिरात अनुमानेे १५० कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन आणि मंदिराची देखभाल यांचा मासिक खर्च अनुमाने ६ ते ७ कोटी रुपये आहे.
‘डॉ. डी.वाय. पाटील बी-स्कूल’मध्ये आर्थिक अपव्यवहार प्रकरणी माजी संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’