काश्मीरमध्ये पर्यटन करणे हेच आतंकवादाला प्रत्युत्तर ! – संदीप देशपांडे, मुंबई शहराध्यक्ष, मनसे

मनसेचे नेते संदीप देशपांडे

मुंबई – पहलगाम येथील घटनेनंतर काश्मीरला भेट देणार्‍या पर्यटकांनी त्यांचे तेथील आरक्षण रहित केले आहे. त्यामुळे तेथील अनेक नियोजित सहली रहित झाल्या आहेत. ज्यांना काश्मीरला जायचे आहे, त्यांनी संपर्क साधावा. काश्मीर सहलीचा प्रारंभ आम्ही आमच्यापासून करत आहोत. काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. तिथे जायला आम्ही घाबरत नाही. पर्यटकांना भारतात कुठेही जाण्याची भीती नाही वाटली पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. काश्मीर हे पर्यटनावर अवलंबून आहे. ते बंद पाडण्याचा आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा डाव हाणून पाडण्यासाठी देश म्हणून एकत्र येऊन काश्मीरमध्ये पर्यटन केले पाहिजे. हेच आतंकवादाला प्रत्युत्तर आहे. कुठल्याही परिस्थितीत भारतातील सगळे नागरिक एकत्र येऊ शकतात, असे विधान मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलतांना केले.