
मुंबई – देशातील सागरी किनारपट्टी असलेली ९ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश यांच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन बैठक घेणार आहेत. या बैठकीला संबंधित खात्यांचे सचिव, आयुक्त आणि संचालक हेही उपस्थित असणार आहेत. २८ एप्रिल या दिवशी मुंबईमध्ये ही बैठक होईल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि पोषण सुरक्षेत भरीव योगदान, त्या अनुषंगाने मच्छिमारांची भविष्यातील वाटचाल, किनारी समस्या आणि विकास योजना यांविषयी या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.