#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली.

पाकिस्तानात ‘स्वतंत्र सिंधु देशा’साठी मोर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील प्रमुख नेत्यांचे फलक ! सध्या पाकमधील राजकीय स्थिती पहाता भविष्यात पाकचे ५ – ६ तुकडे झाल्यास आश्‍चर्य वाटू नये ! भारताने अशी मागणी करणार्‍यांना सर्व प्रकारचे साहाय्य करून पाकचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

धर्म टिकवण्याचे स्वातंत्र्य असणारे काश्मिरी हिंदू आणि त्यांच्या सुरक्षेचे शासनावरील दायित्व

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांच्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तेथील साडेचार लक्ष हिंदू निर्वासित झाले. आज तेच सगळे हिंदू ‘पनून कश्मीर’च्या माध्यमातून काश्मीरमध्ये पुन्हा त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी लढत आहेत.

आंध्रप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करून ६९९ ‘ख्रिस्त गावे’ बनवणार्‍या पाद्रयाला अटक

ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या राज्यात असे पाद्री निपजणे, याहून वेगळे काय घडणार ? हिंदु शासनकर्ता असलेल्या राज्यांत कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर होते का ? उलट कुणी हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश केला, तर त्यालाही विरोध केला जातो !

अल्पवयीन मुलीला ‘हिंदु’ असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करणार्‍या धर्मांधाला अटक

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.

पाकच्या सिंधमध्ये हिंदु शिक्षिकेचे अपहरण करून धर्मांतर

पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे एकता कुमारी या शिक्षिकेचे मियां मिट्ठू याने बलपूर्वक अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली आहे. मियां मिट्ठू याने आतापर्यंत शेकडो हिंदु तरुणींचे धर्मांतर केले आहे.

हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

वर्ष २०२० मध्ये बांगलादेशात १४९ हिंदूंच्या हत्या, तर २ सहस्र ६२३ हिंदूंचे धर्मांतर

भारतात अशा प्रकारची एकही घटना अल्पसंख्यांक धर्मियांच्या संदर्भात घडत नाही, उलट अल्पसंख्यांक धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण होणे, त्यांच्या मंदिरांची आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे, लव्ह जिहाद आदी घटना घडतात.

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

आंध्रप्रदेशात आता सीतामातेच्या मूर्तीची तोडफोड !

प्रतिदिन राज्यात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होऊन मूर्तींची तोडफोड होत असतांना ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी शांत कसे राहू शकतात ? अशी घटना अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांविषयी झाली असती, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !