भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना नेरूळ येथे अटक
नेरूळ येथे एका झोपडीतून ३ बांगलादेशी नागरिकांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. या तिघांनी अवैधपणे भारतात प्रवेश केला असून यातील दोघांनी १२ वर्षांपूर्वी आपल्या पालकांच्या समवेत, तर तिसर्या आरोपीने ६ वर्षांपूर्वी पतीसमवेत भारतात प्रवेश केला होता.