राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची विशेष न्यायालयात माहिती !

मुंबई – महंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख आणि तलाह लियाकत खान या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने नुकतेच याविषयीचे तिसरे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर केले.
पुणे येथील कोंढवा भागात त्यांनी बाँब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. कोल्हापूर आणि सातारा परिसरातील जंगलांत त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँबस्फोट केले होते. शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. हे आतंकवादी महाराष्ट्रात इस्लामिक स्टेटच्या विचारधारेचा प्रसार करून तरुणांना भडकावत होते. ते परदेशातील इस्लामिक स्टेटच्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बाँबस्फोट बनवण्याचे साहित्य मिळवले होते, असे एन्.आय.ए.ने आरोपपत्रात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका
|
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !