कुंभमेळ्याला असलेला ब्रिटिशांचा विरोध : हिंदूंच्या संघटनाचे माध्यम !

प्रयागराज येथे अगदी युगायुगांपासून कुंभमेळा भरत आहे. मोगलांच्या काळात कुंभमेळा चालू होता, त्यानंतर इंग्रजांच्या काळातही तो चालू राहिला. या कुंभमेळ्याला इंग्रजांनी विरोध केला होता.

कुंभमेळ्यातील अन्नछत्रे : जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय व्यवस्था !

लाखो लोकांना भोजन देण्याची व्यवस्था एक वेळ पैसे देऊन उभारताही येईल; मात्र त्यामागील उदात्त विचार ही खरी हिंदु धर्माची अद्वितीयता आहे.

प्रयागराज येथील महाकुंभक्षेत्री सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथ आणि फलक यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा मिळालेला भरघोस प्रतिसाद !

‘प्रदर्शन पाहून मध्यप्रदेशातील ‘जन सेवा समिती’चे प्रदेशाध्यक्ष श्री. रूपसिंह राजपूत प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ अतिशय महत्त्वाचे आहेत. मी समन्वय करत असलेल्या ५१ जिल्ह्यांतील आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत सनातनचे ग्रंथ पोचवण्याचा प्रयत्न करीन.’’ या वेळी त्यांनी स्वतःसाठी काही ग्रंथ विकत घेतले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या विविध विषयांवरील ग्रंथांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘समाजात विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध असतात. ज्याला जो विषय आवडतो, तो त्या विषयावरील पुस्तक, ग्रंथ इत्यादी वाचतो. आपण जे वाचतो त्याचा परिणाम आपले मन आणि बुद्धी यांच्यावर होत असतो. तसेच हा परिणाम काही काळ आपल्यावर टिकून रहातो. याचे कारण हे की प्रत्येक वस्तूत तिची मूलभूत स्पंदने असतात. पुस्तक, ग्रंथ इत्यादींमधून जशा प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात, तसा परिणाम वाचकांवर होतो.

पू. शिवाजी वटकर यांना श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे जाणवलेले वैशिष्ट्य आणि त्यांच्या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या शिकवणीतील साम्य !

‘समाजातील व्यक्ती आणि साधक यांच्याकडून अनेक वेळा सद्गुरु किंवा सत्पुरुष यांनी सांगितलेली साधना, सेवा, वाचन, लेखन इत्यादी गोष्टी केल्या जातात. काही वेळा समाजातील व्यक्ती या गुरु किंवा ईश्वर यांना अपेक्षित असे न करता….

आम्ही सावधान असायला हवे !

वाल्मीकि रामायणातील रामचरित्रच नव्हे, तर सर्वच घटना आणि प्रसंग हे वेदांवर अधिष्ठित आहेत. वाल्मीकि स्वतःच रामायणाला वेदाचे ‘उपबृंहण’ (वेदाचा अर्थ अधिकाधिक स्पष्ट करण्याकरता रचलेले) मानतात. नारदांनी वाल्मीिकंना अतीसंक्षिप्त रामायण सांगितले.

आत्मशांती म्हणजे काय ?

‘आत्मशांती ही सौंदर्य, सांसारिक सुख, स्वर्ग, अष्टसिद्धी इत्यादींहूनही श्रेष्ठ आहे. आत्मशांती हा आपला स्वभाव आहे. मनात काम आला की, तुम्ही अशांत झालात. काम निघून गेला की, तुम्ही शांत झालात. मनाला क्रोध आला की, तुम्ही अशांत आणि क्रोध …

आपण स्वतःसह ईश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे !

जो माणूस स्वतःच स्वतःची घृणा करतो, ‘त्याच्या पतनास आरंभ झाला’, असे समजावे आणि राष्ट्रालाही हेच सूत्र लागू आहे. स्वतःच स्वतःची घृणा न करणे, हेच आपले पहिले कर्तव्य होय; कारण आपल्याला जर उन्नत व्हायचे असेल…

आज करावे गाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची मागणी करण्‍यासाठी, तसेच हिंदूंच्‍या व्‍यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, करावे गाव, सीवूड्स येथे ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

२६.२.२०२५ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.