लखनौचे लवकरच नामांतर होणार !

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्याची राजधानी लखनौचे नामांतर करण्याविषयी विधान केले आहे. येथे पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.

तुर्कीयेमध्ये कडाक्याची थंडी आणि विजेचा अभाव यांमुळे साहाय्यताकार्यात अडथळा !

तुर्कीये आणि सीरिया देशांतील भूकंपामध्ये आतापर्यंत ८ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पडलेल्या इमारतींच्या ढिगार्‍याखाली सहस्रो लोक अडकल्याची शक्यता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होत रहाणार असल्याचे सांगितले जात आहे.

पिळये, धारबांदोडा येथील श्री भूमिकादेवीच्या मंदिरात चोरी

चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराचा हुक तोडून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील सुट्या पैशांची अर्पणपेटी फिरवून ठेवली, तर दुसरी नोटा असलेली अर्पणपेटी फोडून आतील रोख रक्कम पळवली आहे.

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी खात्याकडे १९ अर्ज

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गोवा शासनाने २० कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय प्रावधान केले आहे. यासाठी सरकारकडे आतापर्यंत १९ अर्ज आलेले आहेत- पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेसह राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांविषयी आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्यसेवा, धर्मांतर यांसह राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे प्रश्न मांडून आवाज उठवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नूतनीकरण केलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा ११ फेब्रुवारीला लोकार्पण सोहळा ! – सुभाष फळदेसाई, पुरातत्वमंत्री

गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या मंदिराच्या जीर्णाेद्वाराचे काम करतांना मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व आणि पावित्र्य जपून ठेवण्यात आले आहे.

१० फेब्रुवारीला मुंबईत होणार ‘वंदे भारत’ ट्रेनचे उद्घाटन !

पंतप्रधानांच्या मुंबई दौर्‍याच्या वेळी ड्रोन, पतंग आदी उडवण्यावर बंदी ! ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत.

फेब्रुवारी मासाच्या शेवटी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचे काम चालू होईल ! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या आत विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या सूत्राच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिष्टमंडळास ही माहिती दिली.

‘मॉकड्रिल’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचे म्हणणे मागवले !

आतंकवादी आक्रमणाचे ‘मॉकड्रिल’ चालू असतांना आतंकवाद्यांची भूमिका बजावणार्‍या पोलिसांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्याची घटना चंद्रपूर आणि नगर जिल्ह्यांत घडली होती.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ‘भारतरत्न’ द्या ! – प्रवीण तोगाडिया, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद  

‘जर पाकिस्तान ऐकत नसेल, तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी भारतातून पाकिस्तानात जाणार्‍या नदीचे पाणी अडवावे अन् तरीही ते ऐकत नसतील, तर पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे सोडावीत.’’