जम्मू-काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत सुरक्षादलांनी विविध चकमकींमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चकमकीत २, तर श्रीनगरमधील चकमकीत १ आतंकवाद्याला ठार करण्यात आले.

हिंदुत्वाची तुलना जिहादी आतंकवादी संघटनांशी करणे चुकीचे !  

आपण जरी ‘हिंदुत्व’ही हिंदु धर्माशी संबंधित राजकीय विचारसरणी आहे’, असे समजून त्याच्याशी सहमत नसलो, तरी हिंदुत्वाची तुलना ‘इस्लामिक स्टेट’ आणि जिहादी इस्लाम यांच्याशी करणे चुकीचे अन् अतिशयोक्तीचे आहे, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केले.

(म्हणे) ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे काही जण राक्षस ! – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी

इस्लामचे नाव घेऊन, महंमद पैगंबर यांच्या नावाने आतंकवादी कारवाया करत निरपराध्यांना ठार मारणारे कोण आहेत, हेही राशिद अल्वी यांनी सांगितले पाहिजे !

गेल्या काही शतकांतील हिंदूंच्या दुर्बलतेचे कारण म्हणजे धर्मप्रेमाचा अभाव !

‘बाबरपासून आतापर्यंतच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप इ. थोडे धर्मप्रेमी सोडले, तर बाकी सर्व हिंदू राजे हिंदु धर्माविषयी प्रेम नसलेलेच होते. आजही हीच स्थिती आहे; म्हणून कोट्यवधी हिंदू मूठभर धर्मांध आक्रमकांसमोर हरतात !’

आज देशात होणार्‍या ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणा’साठी महाराष्ट्रातील ७ सहस्र ३३० शाळांची निवड !

केंद्रीय शिक्षण विभागाने देशव्यापी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण’ करण्याचा निर्णय घेतला असून हे सर्वेक्षण देशभरात येत्या १२ नोव्हेंबर या दिवशी करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण २ लाख ३४ सहस्र ५५ विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत.

वेळेत सदनिका न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला सव्याज पैसे परत करावेत !

जर सदनिकेचा ताबा वेळेत दिला नाही, तर बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) व्याजासह संपूर्ण रक्कम ग्राहकाला परत करण्यास बाध्य आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल ग्राहक आयोगाने एका प्रकरणात दिला आहे.

भारत, अमेरिका यांच्यासह जगात पुरुषांमध्ये अविवाहित रहाण्याचा विचार होत आहे प्रबळ !

भारतात प्रत्येक घंट्याला २७ सहस्र, तर प्रत्येक मासाला ८ लाखांहून अधिक विवाह होत असतात; मात्र भारतासह जगभरात सध्याच्या पुरुषांमध्ये विवाह न करण्याचा विचार प्रबळ होत आहे, असे समोर आले आहे.

एस्.टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या न करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन !

मी आत्महत्या करणार्‍यांचे नेतृत्व करत नाही. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आत्महत्या करू नयेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना केले.

नाशिक येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये अप्रसन्नता !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष, अवमान करणारे साहित्यिक, राजकारणी यांचा सहभाग असलेल्या साहित्य संमेलनावर हिंदूंना बहिष्कार घालावासा वाटला, तर चूक ते काय ?