संपादकीय : ‘रिचार्ज’चा फसवा खेळ !
दूरसंचार आस्थापनांच्या रिचार्जमुळे खिशाला कात्री लागत असल्याने ग्राहकांच्या मनातही अस्वस्थता असते. आर्थिकदृष्ट्या किती हानी होत आहे, ते ग्राहकाला समजते; पण दूरसंचार क्षेत्रात झपाट्याने होणारे पालट पहाता ती आजच्या काळाची आवश्यकता झाल्याने प्रत्येक ग्राहक रिचार्जच्या ओझ्याखाली दबलेला असतो.