श्रीलंकेने चीनकडून मागवलेले जैविक खत विषारी असल्याने चीनला परत पाठवले !

चीनमधील खते हानीकारक असल्याने श्रीलंकेने ती परत चीनला पाठवून दिली आहेत. ‘हे खत विषारी आहे’, असे श्रीलंकेने चाचणी केल्यानंतर म्हटले आहे.

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

प्रयोगशाळांच्या कमतरतेमुळे भेसळीच्या नमुने पडताळणीत अडथळे !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे  होऊनही पुरेशा प्रमाणात भेसळ ओळखण्यासाठी चाचणी प्रयोगशाळा नसणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे.

देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये यासाठी लातूर येथील ‘वीर योद्धा संघटने’कडून जनजागृती आणि निवेदन !

‘वीर योद्धा संघटने’चे अभिनंदन ! संघटनेने व्यापार्‍यांचे प्रबोधन केले आणि व्यापार्‍यांनीही यापुढे देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे मान्य केले.

नरकासुर प्रतिमांच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण

ध्वनीप्रदूषण होत असल्याचे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? कुणाच्या तक्रारीसाठी का थांबावे लागते ? प्रशासनाची ही निष्क्रीयताच नव्हे, तर असंवेदनशीलता आहे !

महाराष्ट्रात विविध गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक !

अटक होणार्‍यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सर्वाधिक समावेश असणे यावरूनच त्या पक्षाचे खरे स्वरूप उघड होते !

फोंडा येथे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ. मंजुनाथ देसाई यांना श्रद्धांजली !

श्री. अजित केरकर म्हणाले, ‘‘डॉ. मंजुनाथ देसाई या देव माणसाची जागा आणखी कुणी घेऊ शकेल, असे वाटत नाही. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करावे.’’

‘सरदार उधम’ यांचा अवमान !

‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते !

तामसुली, खांडोळा येथे गेली ४० वर्षे आदर्शरित्या साजरी केली जात आहे दीपावली !

गावातील पूर्वजांनी चालू केलेला हा कार्यक्रम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशूवैद्यकीय चिकित्सालयात वर्षभर औषधेच नाहीत !

वर्षभर औषधे उपलब्ध नसतांना अधिकार्‍यांनी साचेबद्ध उत्तरे देऊन वेळ मारून नेणे, योग्य वाटते का ? वर्षभर औषध नव्हती, तर लोकप्रतिनिधींचे साहाय्य घेऊन ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न का नाही केले ?