चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !

भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हरिद्वार कुंभमेळ्यासाठीच्या आरोग्याविषयीच्या सिद्धतेविषयीचा अहवाल मागितला !  

असा अहवाल न्यायालयाला मागवावा लागतो, याचा अर्थ सरकार आणि प्रशासन निष्क्रीय आहेत, असाच होतो !

कराड (जिल्हा सातारा) येथे अत्यंत उत्साहात पार पडला शिवस्पर्शदिन 

ऐतिहासिक आणि स्फूर्तिदायक घटनेचे स्मरण करण्यासाठी कराड येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन झाले तो दिवस अर्थात शिवस्पर्शदिन अत्यंत उत्साहात पार पडला.

भाजप कार्यकर्ता हीच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची सुरक्षितता ! – खासदार गिरीश बापट

राज्य सरकारने आकसाने सुरक्षा व्यवस्था पालटली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राज्य सरकारच्या खास सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नाही.

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता १२वीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोगल हिंदूंच्या मंदिरांची डागडूजी करत असल्याचा उल्लेख !

एन्.सी.ई.आर्.टी.कडून अशा प्रकारचा धादांत खोटा आणि मोगलधार्जिणा इतिहास शिकवला जाणे, हा देशातील हिंदूंचा विश्‍वासघात आहे. याला उत्तरदायी असणार्‍यांवर भाजप सरकारने कारवाई करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !

हिंदूंच्या मोठ्या मंदिरांच्या जवळ ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराला उत्तेजन देतात ! – चंद्रबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगु देसम्  

हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र ख्रिस्ती नेते मिशनर्‍यांना त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते, तर विवाहाचे वय वाढवण्याची आवश्यकता काय ?’ – काँग्रेसचे नेते सज्जनसिंह वर्मा यांचे विधान !

‘मुली केवळ मुले जन्माला घालण्यासाठी असतात’, असे काँग्रेसवाल्यांना वाटते’ ! अशा संकुचित विचारांच्या काँग्रेसवाल्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे !

श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

रामसेतूच्या संशोधनाला पुरातत्व विभागाची संमती !

इतकी वर्षे पुरातत्व विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? हिंदूंची ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे अन् वास्तू यांविषयी पुरातत्व विभाग नेहमीच निष्काळजी राहिला आहे. रामसेतूच्या संदर्भातही हेच दिसून येते !

भोपाळमध्ये काँग्रेसकडून घरोघर जाऊन श्रीराममंदिरासाठी थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन !

काँग्रेसचे हे श्रीराममंदिराविषयीचे प्रेम म्हणजे ढोंग आहे, हे न कळण्याइतके हिंदू दूधखुळे नाहीत. काँग्रेसला खरेच श्रीराममंदिराविषयी काही करायचे असते, तर पक्षाने संपूर्ण देशात असे अभियान राबवले असते !