आतंकवाद्यांचा कारखाना असणार्‍या पाकला नष्ट करा !

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षीच्या ११ मासांमध्ये सुरक्षादलांनी २११ आतंकवाद्यांना ठार केले, तर ४७ जणांना अटक केली आहे. याव्यतिरिक्त आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या १५० जणांना अटक करण्यात आली आहे.

शेतकरी आंदोलनाच्या नावाने त्यात घुसलेल्या धर्मांध संघटना !

नवी देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना साहाय्य करणार्‍या संघटनांमध्ये देहली दंगलीच्या प्रकरणी नाव आलेल्या ‘युनायटेड अगेन्स्ट हेट’ (यू.ए.एच्.) या इस्लामी संघटनेचाही समावेश आहे. तिला २५ मशिदींमधून साहाय्य मिळत आहे.

समान नागरी कायदा लागू करा !

इस्लामसारख्या एखाद्या धर्मात एकापेक्षा अधिक पत्नींची प्रथा असण्याची आणि इतर धर्मांमध्ये यावर प्रतिबंध लावण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

बेशिस्त भारतियांना लज्जास्पद !

जे लोक कोरोना नियमांचा भंग करत आहेत, त्यांना न्यूनतम ५ ते १५ दिवसांसाठी कोणत्याही कोविड सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे.

अशी मागणी का करावी लागते ?

सुफी इस्लामिक बोर्ड संघटनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘बंदी न घातल्यास आंदोलन करू’, असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !

ब्राझिल येथील जोनास मसेटी यांनी भारतातील गुरुकुलमध्ये ४ वर्षे राहून वेदांचे शिक्षण घेतले आणि आता ते ब्राझिलमध्ये श्रीमद्भगवद्गीता अन् वेद यांचे शिक्षण देत आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दिली.

आता निधर्मीवादी गप्प का ?

साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.

वासनांध धर्मांधांचे ढोंग जाणा !

‘लव्ह जिहाद’ एक राजकीय स्टंट आहे. मी मुसलमान तरुणांना आवाहन करतो की, छळापासून वाचायचे असेल, तर त्यांनी हिंदु तरुणींना बहीण मानावे, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते एस्.टी. हसन यांनी लव्ह जिहादविरोधी कायद्यापासून वाचण्यासाठी केले.

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.