काँग्रेसचे ‘लव्ह जिहाद’वरील प्रेम जाणा !

राजस्थानचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणतात, ‘‘धार्मिक सौहार्द बिघडवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ या शब्दाची निर्मिती भाजपद्वारे करण्यात आली आहे. अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा आणणे हे राज्यघटनाविरोधी आहे.’’

पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार !

नगरोटा (जम्मू-काश्मीर) येथे १९ नोव्हेंबरच्या पहाटे बान टोल नाक्यावर आलेल्या एका ट्रकमधून आतंकवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला. या वेळी ३ घंटे झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले.

अशा काँग्रेसवर बंदी घाला !

देशात मुसलमानविरोधी भावना वाढेल, यामुळे २६/११ च्या मुंबईवरील जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पाकवर आक्रमण करणे टाळले, असा गौप्यस्फोट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे.

धर्मनिरपेक्षतावादी आता कुठे आहेत ?

बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू शाकिब अल् हसन यांनी कोलकाता येथे श्री महाकालीमातेची पूजा केल्यानंतर त्यांना धर्मांधांकडून धमक्या मिळू लागल्या. यावर त्यांनी क्षमा मागितली आहे.

केंद्र सरकारनेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्याने भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री झाली, तर चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

भारताने घुसखोरीपूर्वीच जिहाद्यांवर आक्रमण करावे !

पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि आम्ही त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.

तृणमूल काँग्रेसचे विकासविरोधी अल्पसंख्यांक प्रेम जाणा !

कोलकाता येथील नेताजी बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुसरी धावपट्टी बनवण्यामध्ये एक मशीद अडथळा ठरत असल्याने तिला स्थलांतरित करण्यासाठी बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडे विनंती करूनही सरकारकडून सहकार्य मिळालेले नाही.

धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ?

दावणगेरे (कर्नाटक) येथे ईदसाठी हिंदूंच्या दुकानातून साहित्य खरेदी करणार्‍या मुसलमान महिलांना धर्मांधांनी शिवीगाळ केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.

गांभीर्याचा अभाव असलेल्यांना ओळखा !

‘राज्यशासनाला पैशांची पुष्कळ आवश्यकता आहे. जसे आधी मद्यपान करायचे, तसे लोक आताही करतच आहेत. त्यामुळे ढोंगीपणा करू नका. मद्यविक्री कायदेशीर करा’, असे ‘ट्वीट’ अभिनेते ऋषी कपूर यांनी केले आहे.