पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला नाही. जून २०१९ मध्ये भारताच्या बाजूने निकाल देत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचा, तसेच न्यायालयीन साहाय्य देण्याचा निर्णय दिला होता. याचबरोबर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. ‘न्यायालयाच्या या निर्णयामध्ये दाद मागण्याच्या अधिकाराचा उल्लेख नव्हता’ असे पाकच्या संरक्षण मंत्रालयाचे अधिवक्ता ख्वाजा हरिस अहमद यांनी सर्वाेच्च न्यायालयात सांगितले.
Pakistani Defence Ministry says Kulbhushan Jadhav, jailed since 2016 on spying charges, has no right to appeal.
Despite the 2019 ICJ ruling granting consular access, appeal denied.
🇮🇳 India says he was kidnapped from Iran, rejects espionage charges⚖️pic.twitter.com/nKmM8iNGvu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2025
१. ९ मे २०२३ या दिवशी इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या दंगलींमध्ये कथित भूमिकेसाठी सैनिकी न्यायालयांनी दोषी ठरवलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या प्रकरणांशी संबंधित ही सुनावणी होती. जाधव यांनाही दाद मागण्याचा समान अधिकार देण्यात आला आहे का ? आणि सैनिकी न्यायालयांमध्ये दोषी ठरलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ही सुविधा का देण्यात आली नाही ?, असे सर्वाेच्च न्यायालयाने विचारले असता, संरक्षण मंत्रालयाच्या अधिवक्त्यांनी वरील उत्तर दिले.
२. अधिवक्त्यांनी मान्य केले की, पाकिस्तानने ‘व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन कॉन्सुलर रिलेशन्स’च्या (हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो राजनैतिक संबंधांचे नियम ठरवतो. १९६१ मध्ये व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे करण्यात आला.) कलम ३६चे उल्लंघन केले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्या देशाच्या नागरिकाला दुसर्या देशात अटक केली गेली, तर त्याला त्याच्या देशाच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचा, भेटण्याचा आणि कायदेशीर साहाय्य घेण्याचा अधिकार आहे.
३. यातून पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिवक्त्यांनी कुलभूषण जाधव यांना दिलेले मर्यादित अधिकार पाकिस्तानी नागरिकांनाही दिले जात नाहीत, हे दाखवण्यासाठी त्यांचा खटला उपस्थित केला होता.
४. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना वर्ष २०१६ मध्ये हेरगिरी आणि आतंकवादाच्या आरोपाखाली बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आणि सांगितले की, भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांचे इराणच्या चाबहार बंदरातून अपहरण करण्यात आले होते.