महाराष्‍ट्रात ‘राजमाता जिजाऊ युवती स्‍व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम’ चालू !

मुली आणि महिला यांना स्‍वरक्षण शिकवण्‍यासाठी शासनाच्‍या वतीने १५ जुलैपासून प्रत्‍येकी तीन दिवसीय स्‍वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच समुपदेशन सत्र ठेवलेले आहे.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सव यांनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन !

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३६ वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपोर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकीर्तन आणि  सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका मेरी मिलबेन यांनी गायले भारताचे राष्ट्रगीत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४ दिवसांचा अमेरिका दौरा समाप्त झाला असून ते आता इजिप्तच्या दौर्‍यावर गेले आहेत. तत्पूर्वी अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये अनिवासी भारतियांना संबोधित केले.

भारतीय मुसलमानांनी स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे ! – उद्योगपती जफर सरेशवाला

भारतातील मुसलमानांनी स्वतःला ‘पीडित’ दाखवण्याच्या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि शिक्षणावर लक्ष द्यायला हवे, असे आवाहन भारतीय उद्योगपती तथा ‘मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिर्व्हसिटी’चे माजी कुलगुरु जफर सरेशवाला यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केले.

‘संगम टॉक्स’ च्या माध्यमातून आम्ही हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडत आहोत ! – श्रीमती तान्या मनचंदा, संपादक, संगम टॉक्स

आमच्या पिढीला विशेषतः शहरी युवकांना धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे; परंतु ‘संगम टॉक्स’ या यू-ट्युब वाहिनीच्या (‘चॅनेल’च्या) माध्यमातून युवकांना आम्ही हिंदुत्वाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले

मालेगाव येथे मसगा महाविद्यालयात मौलवीकडून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न !

महाविद्यालयाला हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा अड्डा बनवणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मांतराचे उघडउघड षड्यंत्र रचले जात असल्याने धर्मांतरबंदी कायदा होणे अपरिहार्य आहे !

छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून पुढील पिढीला सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे आपले धर्मकर्तव्य ! – विपुल भोपळे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून हिंदूंना सुरक्षित केले. त्यांना स्वाभिमान मिळवून दिला. याचाच आदर्श घेऊन हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होऊन पुढच्या पिढीला सुरक्षित आणि स्वाभिमानी वातावरण निर्माण करून देणे, हे आपले धर्मकर्तव्य आहे.

पोर्तुगिजांच्या पाऊलखुणा नष्ट करून नवीन गोवा सिद्ध करा !

बेतुल किल्ल्यावर ६ जून या दिवशी आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आवाहन केले.

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मी परदेशात जाऊन राजकारण करत नाही आणि यापुढेही करणार नाही, असे उत्तर परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका तरुणाने विचारलेल्या प्रश्‍नाला दिले. या तरुणाने राहुल गांधी यांचे नाव न घेता ‘अमेरिकेतील काही लोक भारताविषयी वक्तव्ये करत आहेत.

भारतातील इस्लाम सर्वांत सुरक्षित ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘इस्लाम खतरे में है’, अशी बांग ठोकणारे धर्मांध मुसलमान नेता, तसेच ‘भारतात मुसलमान असुरक्षित जीवन जगत आहेत’, अशी आवई उठवणारे महाभाग यांना यावरून जाब विचारला पाहिजे !