कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !

निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर कोल्हापूर येथे गुन्हा नोंद !

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या समर्थनार्थ विनापरवाना रॅली आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए.वाय. पाटील यांच्यासह ४० जणांवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध ! – माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

भाजप घटनेत पालट करत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करते; मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ७३ वेळा घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत.

संवर्धनानंतर श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली !

संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत् खुले करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.

विशेष सरकारी अधिवक्त्यांना वेळ नाही म्हणून खटला लांबवू नये, तसेच जामीन अर्जावरच्या सुनावण्या प्रलंबित राहू नयेत !

अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी न्यायालयाला सांगितले, ‘‘या प्रकरणात ३-३ सरकारी अधिवक्ते असतांनाही विशेष सरकारी अधिवक्ता हर्षद निंबाळकर जाणीवपूर्वक खटल्यांच्या दिनांकांना अनुपस्थित राहून खटला लांबवत आहेत, याची न्यायाधिशांनी नोंद घ्यावी.

उंचगाव यात्राकाळात अखंडित वीजपुरवठा करा ! – राजू यादव

उंचगाव मंगेश्वर मंदिराची त्रैवार्षिक यात्रा १९ ते २४ एप्रिल या काळात होत असून सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेची मागणी अधिक आहे. यात्राकाळात मंदिरासह अनेक ठिकाणी विद्युत् रोषणाई होते. तरी विजेच्या पुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

प्रतापगडप्रमाणे विशाळगड येथील अतिक्रमण हटवू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास प्रारंभ  !

कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संवर्धनास १४ एप्रिलला सकाळी प्रारंभ करण्यात आला. हे संवर्धन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सापडले ५० हून अधिक भ्रमणभाष !

कळंबा कारागृहात भ्रमणभाष सापडल्यावरून प्रशासनावर कडक कारवाई होईल का ?