सावंतवाडी वनविभाग बचतगटांच्या साहाय्याने हाती घेणार जंगलात मिळणार्‍या फळांवर प्रक्रिया आणि विक्री करण्याचा उपक्रम

येथील वनविभाग स्थानिक जंगल परिसरात मिळणार्‍या फळांवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प राबवत आहे. याचे दायित्व येथील महिला बचतगटाकंडे देण्यात येणार आहे. यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, ‘पॅकिंग’ आणि मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे दायित्व वनविभागाचे असणार आहे.

पर्यावरण आणि निसर्ग संपदा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत ! – सुभाष पुराणिक, वन्यजीव अधिकारी

सृष्टीतील सर्व पर्यावरणीय घटक महत्त्वाचे आहेत. या पर्यावरणीय घटकांचे संवर्धन करणे, तसेच आहे ती निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत सिंधुदुर्गचे माजी साहाय्यक वनसंरक्षक आणि पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वन्यजीव अधिकारी सुभाष पुराणिक यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील ३२ सहस्र हेक्टर कांदळवनाला ‘राखीव वन’ घोषित करणार

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कांदळवनाचे संरक्षण करण्याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

छत्तीसगड येथील जामडीचे श्री पाटेश्‍वर धामाला (जिल्हा बालोद) संपूर्णपणे संरक्षण मिळावे ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राज्यपालांना निवेदन

राज्यपाल उइके यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या शिष्टमंडळाला या धामाचे संरक्षण करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

ढगाळ वातावरणामुळे विदर्भात तुरीचे पीक धोक्यात !

तुरीचे पिक धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहे.

पर्यावरण कि राजकारण ?

हिंदु धर्मातील ज्या ऋषिमुनींनी सर्वच क्षेत्रांत अमूल्य संशोधन केले, त्यांनी भौतिक विकासाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊनच त्यांनी मनुष्याची जीवनशैली ठरवली होती. त्यामुळे हिंदु धर्मच पर्यावरणप्रिय आहे. त्यानुसार आचरण करून आपण कोरोनावरही मात करू शकलो, तसे प्रदूषणावरही मात करू शकू !

प्रदूषणाचे कारक

आता जो दृश्य संकटकाळ दिसत आहे, तो वास्तविक संकटकाळ नसून ती निसर्गानेच आरंभलेली शुद्धीकरण प्रक्रिया आहे. निसर्ग त्याचे प्रदूषण स्वतःच दूर करील; त्याचे तडाखे मात्र मानवाला सोसावे लागतील. त्याशिवाय मानवाला स्वतःच्या आचार-विचारांत पालट करावाच लागेल. वृत्ती सुधारली की, सर्व स्तरांवर परिवर्तन घडते !

बत्तीस शिराळा येथे प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे !

शिराळा नगरपंचायतीने प्रत्येक गुरुवारी नो व्हेईकल डे ! पाळण्याचे ठरवले आहे.

दिवाळी फटाक्यांविना साजरी होते, तर ईद प्राणी हत्येविना का नाही ? – कंगना राणावत, अभिनेत्री

कंगना यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, चला, दिवाळी फटाकेमुक्त (फ्री), ख्रिसमस झाडांना कापल्याविना अन् ईद प्राण्यांची हत्या केल्याविना साजरी करूया. सर्व लिबरल्स मंडळी माझ्याशी सहमत आहेत का ?

यंदा नेहमीपेक्षा उन्हाळा कडक असणार ! – हवामान विभाग

राज्यात यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा कमाल तापमान ०.५ ते १ अंश सेल्सिअसने अधिक राहील. त्यामुळे राज्यात यंदा उष्णतेच्या लाटांचे प्रमाण अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.