
मुंबई – मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड येथील ३२ सहस्र हेक्टर कांदळवनाला ‘राखीव वन’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयीच्या हरकती आणि दावे यांची चौकशी तातडीने पूर्ण करून १५ जानेवारीपर्यंत अधिसूचना काढण्याचा आदेश दिला आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले, ‘‘३२ सहस्र हेक्टर कांदळवनातील १५ सहस्र हेक्टर भूमीवरील कांदळवन शासकीय जागेत आहे. महानगर प्रदेशातील कांदळवन मोठ्या प्रमाणात नष्ट करून तेथे घरे बांधण्याची कामे चालू आहेत. त्यासाठी काही ठिकाणी खाडीतही भराव टाकला जात आहे. त्यामुळे कांदळवनाचे संरक्षण करण्यासाठी ही जागा ‘राखीव वन’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे.’’ यापूर्वी ‘कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३’ची आरे वसाहतीमधील कारशेड पर्यावरणाच्या सूत्रावरून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करतांना आरे येथील ८०० एकर जागा ‘राखीव वन’ म्हणून शासनाने यापूर्वीच घोषित केली आहे.
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
Nagar Nigam Varanasi Decision : वाराणसीमध्ये आता मांस आणि मासे मिळणार नाहीत !
Odisha Vigilance Arrests Engineer : ओडिशात अभियंत्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त