भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा नोंद करून ज्ञानपीठ पुरस्कार परत घ्यावा ! – मुख्यमंत्र्याना निवेदन

लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या पुस्तकात हिंदु धर्मासमवेत जिल्ह्यातील १२ कोटी बंजारा समाज बांधवांच्या धर्मभावना दुखावल्या आहेत. त्या समाजातील महिलांविषयी आक्षेपार्ह लिखाण केले.

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

निधर्मीवादी याचा विरोध कधी करणार ?

तिरुपत्तूर (तमिळनाडू) येथील एलापल्ली गावामध्ये हिंदूंच्या २५० वर्षे प्राचीन असणार्‍या अम्मान मंदिराच्या सर्व भिंतींवर आणि फरशांवर ख्रिस्त्यांचा क्रॉस रेखाटण्यात आला असून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

व्यापक विरोधानंतर कर्नाटकातील भाजप सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित !

‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

यवतमाळ येथे वेब मालिका ‘तांडव’वर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्रीआणि केंद्रीय माहिती अन् प्रसारणमंत्री यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

जळगाव येथील धर्माभिमान्यांची ॲमेझॉनला नोटीस !

धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तत्परतेने कृती करणारे निरंजन चौधरी यांचे आणि त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता गिरीश नागोरी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी आणि अधिवक्ते हीच हिंदूंची खरी शक्ती होय !

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

(म्हणे) ‘काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील !’ – जावेद अख्तर, गीतकार

चीन भारताचा शत्रू आहे. अख्तर यांना शत्रूच्या देशाची संस्कृती दर्शवणारे फळाचे नाव मिरवण्यात धन्यता वाटत असेल, तर त्यांची निष्ठा शत्रूच्या देशाशी आहे, असेच समजावे का ? अशा राष्ट्राभिमानशून्य आणि शत्रूप्रेमी कलाकारांची भारताला आवश्यकता नाही !

धर्मांध जावेद अख्तर यांचा हिंदुद्वेष जाणा !

गुजरात सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव ते कमळासारखे दिसते म्हणून ‘कमलम्’ केले. पहिले शहरांची नावे आणि आता फळांची, काही दिवसांनी माणसांच्या अवयवांची नावेही पालटतील, अशी फुकाची टीका गीतकार जावेद अख्तर यांनी केली.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !