(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !

कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

कलंबिस्त मळा येथे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

धर्मांधांनी भारतावर इस्लामी राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पहाणे सोडून द्यावे ! इस्लामी राज्य दूरच, उलट कालमहात्म्याप्रमाणे भारतात सात्त्विक आणि सज्जन व्यक्तींचे हिंदु राष्ट्र स्थापन होणार असल्याचे त्यांनी जाणावे, यातच अख्तर यांच्यासारख्यांचे भले आहे !

अयोग्य पद्धतीने वापर होत असलेल्या देवस्थानांच्या भूमी कह्यात न घेतल्यास उपोषण करणार !

अयोग्य पद्धतीने वापर होत असलेल्या देवस्थानांच्या भूमी कह्यात न घेतल्यास उपोषण करणार !

हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवस्थान आणि तुळजापूरचे श्री भवानीमातेचे देवस्थान यांच्या भूमीविक्रीच्या, दागिन्यांच्या आदी काही प्रकरणांवर आवाज उठवल्यावर त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी चालू झाली आहे.

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची अ‍ॅमझॉनची सिद्धता

अ‍ॅमेझॉनने मनसेच्या विरोधात याचिका केली आहे. त्यावर न्यायालयाकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही पदाधिकारी यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या पुणे आणि मुंबई येथील कार्यालयांची तोडफोड केली. यामुळे आता अ‍ॅमेझॉनने नरमाईची भूमिका घेतली आहे.

नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची भूमी बळकावणार असल्याच्या भूलथापांना बळी पडू नका !

नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची भूमी बळकावणार असल्याच्या भूलथापांना बळी पडू नका !

काही नेते शेतकर्‍यांचे नाव पुढे करून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांवर टीका केली.

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडू

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प रहित करा अन्यथा मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडू

शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांनी प्रस्तावित आयआयटी प्रकल्प पुढील आठवड्याच्या आत रहित करून तो अन्यत्र स्थलांतरित करा अन्यथा यापुढे शेळ-मेळावली येथील ग्रामस्थ मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलन छेडतील.

नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी ठिकाणी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घाला !

नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी ठिकाणी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घाला !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून हे का रोखत नाही ?

व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्‍याने त्याला मद्य पाजून मारहाण केली.

संधीसाधू काँग्रेस !

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?