रत्नागिरी-दिवा पॅसेंजरमधील अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायतीचे निवेदन

पाचल – रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीतील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या वतीने कोकण रेल्वेच्या विभागीय पर्यवेक्षकांना निवेदन देण्यात आले. या वेळी ग्राहक पंचायत रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा सचिव आशीष भालेकर, महिला सचिव श्रेया साळवी, तसेच दिलीप कांबळे आणि उमेश नितोरे उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. रत्नागिरी-दिवा आणि परतीच्या ‘पॅसेंजर’ गाड्यांमधील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेविषयी ग्राहक पंचायतीकडे अनेक प्रवाशांकडून वारंवार तक्रारी होत आहेत. या तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्यांनी स्वतः संबंधित गाडीने प्रवास करून प्रत्यक्ष पहाणी केली. त्या वेळी गाडीतील स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याचा, तसेच त्यांची वेळेवर आणि नियमानुसार स्वच्छता होत नसल्याचा अनुभव वारंवार आला. त्यामुळे प्रवाशांकडून करण्यात आलेल्या तक्रारी वस्तूस्थितीला धरून असल्याचे निदर्शनास आले.
२. या परिस्थितीमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत असून विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणार्या प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतागृहांची अस्वच्छता ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर गोष्ट आहे.
३. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन रत्नागिरी-दिवा-रत्नागिरी ‘पॅसेंजर’ गाडीतील स्वच्छतागृहांची नियमानुसार आणि नियमित स्वच्छता करण्यात यावी, आवश्यक देखभाल करावी, तसेच प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना द्याव्यात.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री