(म्हणे) ‘आम्ही आतंकवादाद्वारे मिळवलेली सत्ता टिकवून दाखवू !’  

तालिबानने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केली होती; मात्र ती ५ वर्षांहून अधिक काळ टिकू शकली नाही, हा इतिहास आहे. तालिबानने हे कायमचे लक्षात ठेवले पाहिजे !

आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश

काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

धर्मसत्तेच्या स्थापनेसाठी देशातील साधू आणि संत संघटित होत आहेत ! – माजी आय.पी.एस्. अधिकरी डी.जी. वंजारा

धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित चालत असतात. स्वातंत्र्यानंतर राजसत्तेची स्थापना झाली; मात्र धर्मसत्तेची स्थापना होऊ शकली नाही.

धारवाड (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाने नकार दिल्याने श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्री गणेशमूर्ती ठेवून आणि तिची पूजा करून आंदोलन करण्यात आले.

कृतीशील हिंदूंची आवश्यकता !

‘केवळ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय !’ अशी घोषणा देणारे नव्हे, तर त्यांच्याप्रमाणे कृती करणारे हिंदू हवेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोटी कोटी प्रणाम !

प.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती
सनातन आश्रम, रामनाथी गोवा येथील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचा आज ७३ वा वाढदिवस !

मैसुरू (कर्नाटक) येथे विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा होत नसल्याने अशा घटना थांबत नाहीत !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले.

आतंकवादाच्या विरोधातील भारताच्या लढ्याची माहिती देणारे पुस्तक ‘ऑपरेशन ट्रॉजन हॉर्स’चे प्रकाशन

हार्परकॉलिन्स प्रकाशन संस्थेचे कार्यकारी संपादक सिद्धेश इनामदार या पुस्तकाविषयी म्हणाले, ‘‘पुस्तकात दिलेली माहिती स्फोटक आणि थरारक आहे. पुस्तकातून भारताने आतंकवादाच्या विरोधात आत्मविश्वासाने दिलेल्या लढ्याची माहिती मिळते.’’

राष्ट्र उभारण्याची प्रेरणा परदेशी विचारांनी प्रभावित नसून ती त्याच्या संस्कृतीतूनच मिळते ! – आरिफ खान, राज्यपाल, केरळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल आरिफ खान बोलत होते. ‘भारताची मूलभूत एकता’ या विषयावर त्यांनी स्वत:चे विचार मांडले.