सांगली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला उपग्रह रामेश्‍वर तेलंगणा येथून अवकाशात झेपावला

तेलंगणाच्या राज्यपाल श्रीमती तमिलीसाई सौंदर्याराजन्, इस्रोचे माजी संचालक डॉ. ए. शिवथानू पिलाई, इस्रोचे संचालक पद्मश्री डॉ. मल्लयस्वामी अण्णादुराई उपस्थित होते.

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे त्रिस्तरीय नाकाबंदी

कोरोनामुळे यंदाच्या वर्षी माघ यात्रा भाविकांविना साजरी करण्यात येणार आहे. या काळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

पं. भीमसेन जोशी हे मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा दुवा होते ! – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही; पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे.

एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करता सवा पाच कोटी रुपये देयक पाठवणार्‍या पुणे येथील स्पर्श रुग्णालयावर कारवाई करावी !

सेंटरसाठी महापालिकेने करारच केला नसतांना आणि एकाही रुग्णावर उपचार झाले नसतांना हे देयक मागणे ही महापालिकेची शुद्ध फसवणूक आहे.

श्री क्षेत्र वीर, सासवड येथील श्री म्हस्कोबा यात्रा रहित करण्याचा निर्णय

भाविकांनी यात्रेसाठी गावात येऊ नये, असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आणि देवस्थान समिती यांनी केले आहे.

कोटीशः प्रणाम !

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश (मोरटक्का, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन (दिनांकानुसार)

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अत्यंत दयनीय !  

याविषयी भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडणार नाहीत; मात्र भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांवर दगड भिरकावण्यात आल्याची अफवा जरी पसरली, तरी हिंदूंना लगेच ‘तालिबानी’, ‘असहिष्णु’ ठरवून ते मोकळे होतात !

न्यूयॉर्क विधानसभेकडून ‘५ फेब्रुवारी’ हा ‘काश्मीर अमेरिकन दिवस’ घोषित

पाक साजरा करत असलेल्या ‘काश्मीर एकता दिवसा’च्या पार्श्‍वभूमीवर न्यूयॉर्क विधानसभेची भारतविरोधी कृती ! भारताने केवळ पोकळ निषेध नोंदवण्याऐवजी अमेरिकाला समजेल आणि ती माघार घेईल, अशा भाषेत तिला फटकारले पाहिजे !

मी कायमच गंगा आणि तिच्या उपनद्या यांवरील जलविद्युत प्रकल्पांच्या विरोधात होते ! – उमा भारती

उमा भारती जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या तेव्हा त्यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी धरणे बांधू नयेत, असे प्रतिज्ञापत्र सांगूनही त्यावर कार्यवाही का झाली नाही ? जनतेसाठी, तसेच पर्यावरणासाठी हानीकारक असणारे असे प्रकल्प उभारणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

हिंदु धर्माचा उपहास करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍याला मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले !

अशांना केवळ शाब्दिक फटकारे लगावण्यासह त्यांना कारागृहात डांबण्याचीही शिक्षा न्यायालयाने करावी, असेच हिंदूंना वाटते !