कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना

बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

राजदीपाखाली अंधार !

राजदीप सरदेसाई, काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि अन्य ५ पत्रकार यांवर देहली येथील हिंसाचाराविषयी सामाजिक माध्यमांतून खोटी माहिती पोस्ट केल्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा उत्तरप्रदेश पोलिसांनी नोंदवला आहे.

चंद्राचा झोप आणि मासिक पाळी यांच्यावर होतो परिणाम ! – संशोधकांचा निष्कर्ष

उत्तर अर्जेंटिनातील फोर्मोसा भागातील टोबा-कूम हा आदिवासी समुदाय आणि सिएटलमधील साडेसात लाखांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांचे निरीक्षण करून हे संशोधन करण्यात आले आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यात भारतातील भावी पिढी !

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार देशातील १० ते १७ वयोगटांतील १ कोटी ४८ लाख मुले अल्कोहोल, अफीम, कोकेन, भांग यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

कुठे चित्रपटगृह पाडून हिंदु मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करणारी अमेरिका आणि कुठे विकासाच्या नावाखाली मंदिरांना पाडणारा भारत !

हूवर (अलाबामा, अमेरिका) येथे हूवर नियोजन आणि झोनिंग आयोगाच्या झालेल्या बैठकीत येथील ३८ सहस्र चौरस फूट जागेत वसलेले चित्रपटगृह पाडून ती जागा हिंदु मंदिरास देण्याची शिफारस करण्यात आली.

(म्हणे) ‘तैवानने स्वातंत्र्याची घोषणा करण्याचा अर्थ युद्ध !’- चीनची धमकी

चीनचे त्याच्या शेजारी असणार्‍या २४ देशांशी सीमावाद आहे आणि त्यातून त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे. चीनच्या विरोधात आता सर्वच देशांनी एकत्र येऊन त्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे !

ब्रिटिश आस्थापन केर्न एनर्जीकडून ८ कोटी ७५ लाख रुपयांची भारत सरकारची संपत्ती जप्त करण्याची धमकी

भारत सरकारने या न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन न केल्यास भारताची विमाने आणि जहाजे कह्यात घेतली जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.