कर्नाटकातील काँग्रसचे नेते सिद्धरामय्या यांनी त्यांना विकासावरून प्रश्‍न विचारणार्‍या ग्रामपंचायत सदस्याला व्यासपिठावरून खाली ढकलले !

सिद्धरामय्या काही वर्षे एका राज्याचे मुख्यमंत्री होते, हे देशाला लज्जास्पद !

‘लव्ह जिहाद’विरोधी कायदे राज्यघटनेच्या चौकटीत आहेत कि नाही ?, यावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या ‘दोन्ही राज्यांनी केलेले लव्ह जिहादविरोधी म्हणजे धर्मांतरविरोधी कायदे घटनाबाह्य आहेत’, असे सांगत या कायद्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

पंचगंगा नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना थेट टाळे लावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका अभिनंदनीय असून त्यावर कठोरपणे कारवाई व्हायला हवी !

मनसेच्या विरोधातील खटला मागे घेण्यासाठी ‘अ‍ॅमेझॉन’कडून न्यायालयात अर्ज

 आंतरराष्ट्रीय आस्थापनांना दांडुक्याचीच भाषा कळते असे समजायचे का ?

अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

श्री तुळजाभवानी मंदिरातील ८ पुजार्‍यांना ३ मास प्रवेश बंदीचे आदेश

श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने ८ पुजार्‍यांना ३ मास मंदिर प्रवेश बंदीचे आदेश काढले आहेत, तर अन्य १६ पुजार्‍यांना सहा मासांसाठी श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेशबंदी का करण्यात येऊ नये, याची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच-विश्‍व हिंदू परिषद

अंमलबजावणी संचालनालयाकडून सौ. वर्षा राऊत यांना पुन्हा नोटीस

सौ. राऊत यांना ११ जानेवारी या दिवशी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

पिंपरी महापालिकेच्या १ सहस्र ३०० मिळकतींचा अवैध वापर; कोट्यवधींची हानी – माजी खासदार गजानन बाबर

महापालिकेचे व्यापारी गाळे, भाजी मंडईचे गाळे आदी मिळून पालिकेच्या मालकीच्या जवळपास १ सहस्र ३६९ मिळकतींचा अवैध वापर होत असून पालिकेची २ वर्षांत ३ कोटींची हानी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांना कळवले आहे.