स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसलीच पाहिजेत ! – विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक

‘औरंगाबाद’ शहराच्या नामांतराविषयी विश्‍व हिंदू परिषदेची भूमिका

नगर – औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे, यासाठी आमचा पाठिंबा असेलच; कारण स्वतंत्र भारतात परकियांची नावे पुसली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. तसेच ‘अहमदनगर’ शहराचे नावही ‘नगर’ असावे, असे आमचे मत आहे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त मंत्री दादाजी वेदक यांनी व्यक्त केले. नगरमध्ये ५ जानेवारी या दिवशी विश्‍व हिंदू परिषदेची पत्रकार परिषद झाली. या वेळी वेदक यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराविषयी आपली भूमिका मांडली.


या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विश्‍व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी, ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.