हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी

जळगाव, २२ सप्टेंबर (वार्ता.) – बांगलादेशासमवेत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने भारतात आयोजित करण्यात आले आहेत. ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. क्रिकेट खेळणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, असा हा प्रकार आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अद्यापही अत्याचार चालू आहेत. तेथील शेकडो हिंदूंच्या चिता अद्याप शांत झालेल्या नाहीत, मग असे असतांना क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. हे सामने तात्काळ रहित करावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ, कोर्ट चौकात निदर्शने करण्यात आली. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मा. पंतप्रधान, मा केंद्रीय क्रीडामंत्री, मा. परराष्ट्रमंत्री, तसेच ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष यांना पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ? |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी