औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव देण्याचा मंत्रीमंडळाचा निर्णय

मुंबई – औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांने नाव देण्याचा निर्णय ६ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने लवकरात लवकर अधिसूचना काढावी, असे केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीप पुरी यांना कळवले आहे. याविषयी केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. वर्ष २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात याविषयीचा ठराव संमत करण्यात आला होता.