पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करून देहलीत चालू झाली चालकविरहित मेट्रो !

देहलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या स्वयंचलित म्हणजे चालकविरहित मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रो ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही मेट्रो ३७ किमीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोला संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टिम आहे. मेट्रोच्या ‘मॅजेन्टा लाइन’ आणि ‘पिंक लाइन’ यांवर ही मेट्रो चालवली जाणार आहे.

अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे लैंगिक शोषण करून विकणार्‍या मदरशाच्या मौलानाला अटक

हिंदु संतांवर खोटे आरोप करून त्याची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मी चाकूद्वारे पंतप्रधान मोदी यांना मारेन !’ – शेतकरी आंदोलनामधील एका महिलेची धमकी

शेतकरी आंदोलन कोणत्या दिशेने जात आहे, हेच यातून लक्षात येते ! सरकारने अशांना शोधून त्यांच्यावर तात्काळ  कारवाई करणे आवश्यक आहे आणि याप्रकरणी शेतकरी संघटनांनीही स्पष्टीकरण द्यायला हवे !

उत्तरप्रदेशात जातीचे स्टिकर्स असलेल्या गाड्यांवर होणार कारवाई

एकीकडे सर्व राजकीय पक्ष जातपात नष्ट करण्याची भाषा करतात; मात्र दुसरीकडे जातीचे राजकारण खेळत अशा घटनांकडे दुर्लक्ष करतात !

अधिवक्ता महमूद प्रचा यांच्या कार्यालयावर पोलिसांची धाड

देहली दंगलीतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्यांनी खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे या आरोपीला खोटी जबानी देण्यास बाध्य केले. तसेच अन्य एका अधिवक्त्याच्या हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जो ३ वर्षांपूर्वीच मृत पावला होता.

बांगलादेशात फाशी ठोठावलेल्या गुन्हेगाराला १० वर्षांनंतर देहलीत अटक !

बांगलादेशातील गुन्हेगार हे घुसखोरी करून भारतात येऊन लपून रहातात; मात्र भारतीय सुरक्षायंत्रणा आणि पोलीस झोपलेले असल्याने त्यांचे फावते, हेच यातून लक्षात येते ! घुसखोरांसह अशांवरही कारवाई आवश्यक !  

वर्ष २०२१ मध्ये कर्करोगावर औषध सापडणार ! – बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

बल्गेरिया येथील भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांचा वर्ष १९९६ मध्ये मृत्यू झाला असला, तरी त्यांनी पुढील अनेक दशकांविषयीची भविष्यवाणी करून ठेवली आहे. त्यांनी यापूर्वी वर्तवलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत

देहलीमध्ये मांस विक्रेत्यांना मांस ‘हलाल’ कि ‘झटका’ पद्धतीचे आहे, हे सांगणे बंधनकारक ठरणार !

अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे. हलाल पद्धतीमुळे मुसलमान समाजाची मांस विक्रीमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाल्याने हिंदु खाटीक समाज बेरोजगार होत आहे आणि हिंदूंना वर्ज्य असतांनाही हलाल मांस खावे लागत आहे !

मुसलमानबहुल भागात पोलीस, शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी मुसलमानच ठेवावा !

काँग्रेसच्या राज्यात सच्चर आयोगाने अशाच प्रकारची शिफारस केली होती, तीच शिफारस आता अल्पसंख्यांक मंत्रालय करत असेल, तर अद्याप या मंत्रालयात काँग्रेसी मानसिकतेचे अधिकारी आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

४९ दिवसांत गुन्हा न नोंदवल्याने देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले !

मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचे प्रकरण : न्यायालयाने अशा पोलिसांना केवळ फटकारण्यासह कठोर शिक्षाही सुनवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे !