१ जानेवारीनंतर शेतकरी आंदोलन कोणत्याही थराला नेऊ ! – काँग्रेसचे खासदार रवनीतसिंह बिट्टू

अशा प्रकारचे विधान करून काँग्रेसचे खासदार कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ पहात आहेत, हे लक्षात येते ! त्यामुळे पोलिसांनी सतर्कता म्हणून त्यांना कह्यात घेऊन कारागृहातच डांबले पाहिजे !

हत्येच्या प्रकरणातील आरोपीचे तिहार कारागृह परिसरातून अपहरण

देशातील प्रमुख अशा राजधानी देहलीतील या कारागृहामध्ये अशा प्रकारची घटना होणे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! इथे असणारे जिहादी आतंकवादी आणि मोठे गुन्हेगार यांना कुणी अशा प्रकारे पळवून नेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नव्या कृषी कायद्याद्वारे शेतकऱ्यांची भूमी बळकावणार असल्याच्या भूलथापांना बळी पडू नका !

काही नेते शेतकर्‍यांचे नाव पुढे करून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्याला विरोध करणार्‍यांवर टीका केली.

देहली विमानतळावरून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) गेल्या काही वर्षांपासून पसार असणार्‍या खलिस्तानी आतंकवादी गुरजीतसिंह निज्जर याला देहली विमानतळावरून अटक केली. वर्ष २०१७ मध्ये निज्जर सायप्रस या देशामध्ये पळून गेला होता.

ब्रिटनहून आलेले ५ कोरोनाबाधित प्रवासी विमानतळावरून पसार

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसमवेतची विमान वाहतूक स्थगित केली आहे. त्यापूर्वी ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी ५ कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) रुग्णांनी देहली विमानतळावरूनच पलायन केल्याची घटना घडली.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे एअर इंडियाकडून ओमान आणि सौदी अरेबिया येथील विमानसेवाही स्थगित

कोरोनाच्या नव्या प्रकाराचे भारतात संक्रमण होऊ नये म्हणून एअर इंडियाने ब्रिटनसह ओमान आणि सौदी अरेबिया येथे जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे.

कोरोना लसीमध्ये डुकराच्या मांसाचा वापर झाल्याच्या माहितीवरून इस्लामी देशांमध्ये चिंता

कोरोनाचे लसीकरण जगातील काही देशांमध्ये चालू झाले आहे. भारतातही लवकरच ते चालू होणार आहे; मात्र मुसलमान देशांनी चिंता व्यक्त केली आहे, ‘ही लस सडलेल्या पशूंची चामडी, हाड, गुरे आणि डुक्कर यांची चरबी उकळवून बनवली जात आहे.

आरक्षणाचा अधिकार असणारे गुणवान उमेदवार खुल्या प्रवर्गातूनही पदासाठी अर्ज करू शकतात ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नोकरीमध्ये पद भरण्यासाठी उमेदवारांच्या जातींऐवजी त्यांच्या योग्यतेकडे लक्ष दिले पाहिजे आणि गुणवत्ता असणार्‍या उमेदवारांना साहाय्य केले पाहिजे. कोणत्याही स्पर्धेमध्ये नेहमीच योग्यतेवरच उमेदवाराची निवड झाली पाहिजे.

कोरोनाच्या विरोधातील लस घेणे ऐच्छिक ! – केंद्र सरकार

एखाद्याला पूर्वी कोरोनाची लागण झाली असेल किंवा नसेल, तरीही लसीची पूर्ण मात्रा घेणे आवश्यक आहे, तरच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होईल. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आवश्यक त्या अँटिबॉडीज निर्माण होतात.

खासगी रुग्णालयांवर कोरोना उपचारांसाठीच्या शुल्कावर मर्यादा घालण्याची आवश्यकता ! – सर्वोच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारने स्वतःहून हे करणे जनतेला अपेक्षित आहे !