हिंदूंचे खरे युद्ध विरोधकांच्या खोट्या ‘नॅरेटिव्हज्’च्या (कथानकाच्या) विरोधात !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले मार्गदर्शन
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेले मार्गदर्शन
हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….
‘जगात एकही हिंदु राष्ट्र नाही’, याची माहिती देणारा फलक सभागृहाच्या प्रदर्शनात लावण्यात आला होता. यामध्ये जगातील मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, तसेच अन्य धर्मीय राष्ट्रांची आकडेवारी देण्यात आली होती.
सध्या रामनाथी (गोवा) येथील श्री रामनाथ देवस्थानामध्ये ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. १६ जून या दिवशी या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
अनेक न्यायालयीन प्रक्रियांमध्ये धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अधिवक्ते लाभले ! धर्मकार्य करणार्या धर्माभिमान्यांना साहाय्य करणारे उद्योगपती भेटले ! हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांच्या विरोधात वैचारिक लढा देण्यास प्रारंभ झाला !
‘१६.६.२०२३ या दिवशी रामनाथ देवस्थान येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी देवाने आमच्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे.
अद्यापही सरकार काश्मिरी हिंदूंचा नरसंहार मान्य करायला सिद्ध नाही. त्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्मीरमधील नरसंहार मान्य केला जात नाही, तोपर्यंत काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्य नाही.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण वर्ष २०१० पासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या भ्रष्टाचाराची सी.आय्.डी. चौकशी पूर्ण होऊन ४ वर्षे झाली; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही, हे खेदजनक आहे. सद्यःस्थितीतही मंदिरामध्ये भ्रष्टाचार चालू आहे.
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या द्वितीय दिवशी (१७.६.२०२३ या दिवशी) दुसर्या सत्रामध्ये ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . .