केंद्र सरकारचे पाकविरोधात महत्त्वाचे ५ निर्णय !

नवी देहली : पहलगाम आक्रमणावर प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या सुरक्षेच्या संदर्भातील समितीच्या बैठकीत पाकच्या सदंर्भात ५ मोठे निर्णय घेण्यात आले. यात भारतातील पाकिस्तानच्या दूतावासातील सैन्य सल्लागारांना परत जाण्याचा आदेश देण्यात येणार आहे. त्याच वेळी भारतही पाकमधील त्याच्या दूतावासातील अशाच अधिकार्यांना माघारी बोलावणार आहे. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रहित करण्यात आले आहेत. त्यांना येत्या ४८ घंट्यात भारत सोडून जाण्यास सांगण्यात येणार आहे. पाकसमवेतचा सिंधु पाणी करार रहित करण्यात आला आहे. अटारी सीमेवरील चौकी बंद करण्यात आली आहे.
#MEABriefing ||
Briefing the media on the Cabinet Committee on Security (#CCS) Meeting, Foreign Secretary Vikram Misri outlines the outcomes of the meeting:
1.𝐒𝐮𝐬𝐩𝐞𝐧𝐬𝐢𝐨𝐧 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐖𝐚𝐭𝐞𝐫𝐬 𝐓𝐫𝐞𝐚𝐭𝐲: The landmark 1960 agreement between India and… pic.twitter.com/jAs5ziyzDB
— All India Radio News (@airnewsalerts) April 23, 2025
या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
🇮🇳 RESPONDS TO PAHALGAM ATTACK
India takes 5 BIG actions against Pakistan, including suspending the Indus Waters Treaty, closing Attari border, cancelling SAARC visas & expelling defense advisors.#पहलगाम_आतंकी_हमला#PahalgamTerroristAttack
VC: @ZeeBusiness pic.twitter.com/igyQcw1R07— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 24, 2025
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, बैठकीत आक्रमणाचा तीव्र निषेध करण्यात आला. जगातील अनेक देशांनी या आक्रमणाचा निषेध करत भारताला पाठिंबा दर्शवला आहे. बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.