सत्ताकाळात आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात ठोस कारवाई न करू शकणार्या काँग्रेसची उठाठेव !
मुंबई – पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी २३ एप्रिल या दिवशी काँग्रेसकडून दादर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, या आक्रमणाची माहिती गुप्तचर विभागाला का प्राप्त झाली नाही ? असा प्रश्न उपस्थित करत सुरक्षा यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वेळी काँग्रेसचे अधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.