हिंदूंवरील आक्रमण कदापि खपवून घेणार नाही !

‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजीतील निषेध सभेत चेतावणी

पणजी येथील निषेध आंदोलनात सहभागी  हिंदू

पणजी – प्रथम बंगालमध्ये आणि आता काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. असा प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या जाज्वल्य विचारांनुसार आचरण करण्याची आज वेळ आलेली आहे, अशी चेतावणी ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ यांच्या वतीने पणजी येथे आयोजित निषेध सभेत देण्यात आली. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ ‘गोवा हिंदु युवा शक्ती’ची यांच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी आझाद मैदान, पणजी येथे या निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये ‘मातृशक्ती संघटना’, ‘आंतरराष्ट्रीय बजरंग दल’, ‘सनातन संस्था’, ‘हिंदु जनजागृती समिती’ आदी संघटनांनी सहभाग घेतला होता.

धर्मांधांवर बहिष्कार घातला पाहिजे ! – सृजन नाईक

याप्रसंगी ‘हिंदु युवा शक्ती संघटने’चे श्री. सृजन नाईक म्हणाले, ‘‘पहलगाम येथे झाले ते गोव्यात घडायला वेळ लागणार नाही. आज हिंदूंनी जातपात सोडून हिंदु या नात्याने एकत्र येणे काळाची आवश्यकता आहे. आम्हाला धर्म विचारून जर मारले जात असेल, तर आम्ही सामान खरेदी करतांना दुकानदाराचे नाव विचारून धर्मांधांवर बहिष्कार घातला पाहिजे.’’

हिंदूंनी जमाव चालून आल्यास कसे सामोरे जायचे, ते शिकावे ! – जयेश थळी

गोवा मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘स्वसंरक्षण प्रशिक्षण आज काळाची आवश्यकता बनली आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षण शाळेपासून द्यायला प्रारंभ केला पाहिजे. महाभारत, रामायण आदींमधून आम्ही दृष्टांचा संहार करायला शिकलो. आज हिंदूंनी एखादा जमाव चालून आल्यास त्याला कसे सामोरे जायचे ? याचा विचार करून ठेवला पाहिजे.’’


सौजन्य : OUT OF BOX GOA MEDIA

आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभागाचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळी अशा क्रूर घटनेचा निषेध करावा लागणे, हे दुर्दैव आहे.’’

या वेळी ‘जलाओ जलाओ, पाकिस्तान जलाओ’, ‘हमसे जो टकराएगा, मिट्टी मे मिल जायेगा’, अशा आशयाच्या देशभक्ती वृद्धींगत करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. निषेध आंदोलनाला हनुमानचालिसा पठणाने प्रारंभ झाला.