१ रुपयात ‘पिक विमा योजने’ला शेतकर्‍यांनीच ‘चुना’ लावला ! – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – ‘एक रुपयातील पीक विमा योजना अडचणीत आली आहे. अगदी ग्रामीण भाषेत सांगायचे तर शेतकर्‍यांनी या योजनेला ‘चुना’ (फसवणूक करणे) लावला आहे,’ असे सांगत १ रुपयात ‘पीक विमा योजना’ बंद करण्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते ‘दिशा कृषी उत्पन्नाची – २०२९’ या पंचवार्षिक आराखड्याच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. या प्रसंगी ‘व्हॉट्सॲप’ चॅनलच्या ‘क्यू.आर्. कोड’ (‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोडप्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) आणि ‘सेवादूत अ‍ॅप’चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांच्या पाठीशी राज्यशासन कायमच उभे आहे. महायुती सरकारने पहिल्या दिवसापासून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नाउमेद न होता आत्मविश्वासाने पुढे यावे. जुन्या पीक विमा योजनेतील निकष पालटून नव्याने ही योजना सिद्ध करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल.