धर्मकार्यात आध्यात्मिक बळाची आवश्यकता !
भारताला सदैव महान सेनानींची आवश्यकता पडते. त्यांची महर्षि दधीचि यांच्यापासून स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांपर्यंत अखंड शृंखला चालत आलेली आहे. त्या सर्वांच्या मागे सातत्याने एक दैवी शक्ती कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. ती शक्ती, म्हणजे ‘अध्यात्म’ आहे.