पाक नागरिकांना ‘आतंकवादी’ म्हटल्यावरून ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीला १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड

पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !

फ्रान्सने बनवला इस्लामी कट्टरतावादाला रोखणारा मसुदा !

लवकरच कायद्यात रूपांतर करणार ! फ्रान्सचे करू शकतो, ते गेली ३ दशके जिहादी आतंकवाद आणि कट्टरतावाद यांमुळे पीडित असलेला भारत का करू शकत नाही ?

फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद करणार्‍या धर्मांधांच्या मृतदेहाची त्याच्या चेचन्या येथील गावी काढण्यात आली अंत्ययात्रा !

मुसलमानबहुल चेचन्यामध्ये कोणत्या मानसिकतेचे लोक आहेत, हे लक्षात येते ! जगात असे किती ठिकाणे आहेत, याचा विचार करून त्यांना बहिष्कृत करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर शेतकरी आंदोलनाचे समर्थन करतांना खलिस्तानी आणि भारतविरोधी घोषणा

यातून हे लक्षात येते की, शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तान्यांचा समावेश असणार ! केंद्र सरकारने याचा शोध घेऊन त्यांना उघड करावे, असेच भारतियांना वाटते !

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !

भारतविरोधी ट्रूडो !

स्वत:च्या देशात मानसिक आजार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यसने, महिलांवरील हिंसा इत्यादी प्रश्‍नांविषयी ट्रूडो यांनी लक्ष दिल्यास कॅनडावासियांना साहाय्याचे ठरले असते; मात्र खलिस्तानवादाचे भूत डोक्यावर बसलेल्या ट्रूडोंना ते कळणार नाही. आता केंद्र सरकारने केवळ उत्तर देऊन नव्हे, तर ट्रूडो यांना खडसावून लगाम घालावा, ही अपेक्षा !

गुरु आणि शनि ग्रहांच्या युतीमुळे राजकीय पक्ष अन् संघटना यांमध्ये फूट पडण्याची शक्यता

भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारखे विषय पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. यामुळे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटू शकते.

ब्रिटनचे पंतप्रधान श्रीरामाचे नाव घेऊन शुभेच्छा संदेश पाठवतात. एकातरी भारतीय राजकीय पक्षाचे नेते देवाचे नाव घेऊन संदेश पाठवतात का ?

ज्याप्रमाणे भगवान श्रीराम राक्षसराज रावणाला पराभूत करून पत्नी सीता यांच्या समवेत अयोध्येला परतले आणि लाखो दिवे लावून त्यांचे स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे आपणही या दीपावलीला कोरोनाच्या विरोधात विजय मिळवू

वर्ष २०२१ मध्येही कोरोना कायम रहाणार ! – मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांची भविष्यवाणी

वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार

अमेरिकी लोकांचा आत्मविश्‍वास असलेल्या कुणाहीसमवेत आम्ही काम करू; मात्र हा आत्मविश्‍वास असलेल्या व्यक्तीचा विजय विरोधीपक्षाला मान्य असेल, तरच काम करू.