दलाई लामा यांच्याकडून ८ वर्षीय मुलाला बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा नेता म्हणून घोषित !

सामाजिक माध्यमांवर या कार्यक्रमाची छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये ८७ वर्षीय दलाई लामा लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि मुलाला भेटतांना दिसत आहेत. या मुलाचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

बौद्ध धर्माला नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न कदापी यशस्वी होणार नाही ! – दलाई लामा

चीनच्या सरकारने बौद्ध धर्म नष्ट करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते यात कदापी यशस्वी होणार नाही. चीनने अनेकदा बौद्ध धर्माला हानी पोचवली आहे; मात्र तरीही तो या धर्माला नष्ट करू शकला नाही; कारण आजही चीनमध्ये बौद्ध धर्म मानणारे लोक आहेत, असे विधान तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरु दलाई लामा यांनी येथे केले.

गुजरातमध्ये ४५ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

राजस्थानात २५० दलित कुटुंबांनी हिंदु धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला !

पोलीस, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार करूनही आरोपींवर कारवाई न झाल्याने निर्णय !

देशामध्ये द्वेष पसरवणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे बौद्ध संघटनांचे राष्ट्रपतींना पत्र !

दसर्‍याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते.

चीन तिबेटच्या बौद्ध धर्मगुरु पदावर स्वतःची व्यक्ती बसवण्याच्या प्रयत्नात !

चीन तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या जागेवर त्याच्या नियंत्रणातील व्यक्तीला बसवू पहात असल्याची माहिती चीनच्या काही गोपनीय कागदपत्रांद्वारे समोर आली आहे.

मुसलमानांकडून लडाखमध्ये बौद्ध मंदिर बनवण्यास विरोध झाल्याने सहस्रो बौद्ध रस्त्यावर !

‘मुसलमान-बौद्ध भाई भाई’ अशी घोषणा देणार्‍यांना आता यावर काय म्हणायचे आहे ?

सोंडेघर (दापोली) येथे ग्रामस्थांत १०० वर्षांचा सलोख्याचा करार

असे जर एका छोट्याशा गावात होत असेल, तर ते संपूर्ण देशात का होऊ शकत नाही ? दापोली तालुक्यात यापूर्वींही वर्ष २०१५ मध्ये बुरोंडी गावामध्ये हिंदु आणि मुसलमान यांच्यामध्ये सलोखा राखण्यासाठी १०० वर्षांचा करार करण्यात आला आहे. असा करार करणारे सोंडेघर हे दुसरे गाव आहे.

वेरूळ येथे हिंदु धर्म आणि बौद्ध अन् जैन पंथांच्या लेण्या असल्याने तेथील केवळ जैन पंथाचा उल्लेख असलेला स्तंभ काढून ‘जागतिक वारसा’ हा फलक लावणार !

स्तंभ स्थलांतरित करण्यास जैन संघटनांचा विरोध : कीर्तीस्तंभ ४८ वर्षांपासून आहे. यातून एका विशिष्ट धर्माचा प्रसार होत नाही. ते येथून स्थलांतरित करण्यास आम्ही विरोध करू.

अनुसूचित जाती आणि जमातींतील व्यक्तीने धर्मांतर केल्यास तिला त्यांच्यासाठीच्या योजनांचा लाभ मिळणार नाही ! – केंद्रशासन  

आंध्रप्रदेशात धर्मांतरितांनाही अनुसूचित जाती आणि जमाती यांसाठीचे लाभ मिळणार !