
मुंबई, १६ जुलै (वार्ता.) – नक्षली कारवायांमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या गडचिरोलीतील अतीदुर्गम आणि जंगलव्याप्त भागात २२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे या भागामध्ये सामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय सुविधा पोचवणे कठीण होते. अशा भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ स्थापन करणे म्हणजे एकप्रकारे नक्षली चळवळ कमकुवत झाल्याचे द्योतक आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना छोट्या-छोट्या शासकीय कामासाठी तालुका किंवा जिल्हा स्तरावर जावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसा जात होता, तसेच नागरिकांना मोठी पायपीटही करावी लागते. ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ चालू झाल्यावर शासकीय सेवा जवळच उपलब्ध होणार आहेत. याविषयी १६ जुलै या दिवशी शासन निर्णय काढण्यात आला आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा