स्वतःच्या आचरणातून ‘शिष्यभावात कसे रहावे ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे.