स्वतःच्या आचरणातून ‘शिष्यभावात कसे रहावे ?’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे.

नवरात्रीच्या कालावधीत झालेल्या दशमहाविद्या यागांच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी सांगत असतांना ‘देवी आश्रमात राहून आम्हा सर्वांचा उद्धार करत आहे’, असे मला वाटत होते. मला त्या संदर्भातील दिव्य अनुभूती हृदयामध्ये जाणवत होती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या भुवनेश्वरी यागाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना पू. रमेश गडकरी यांना आलेल्या अनुभूती

यज्ञातील आहुतीच्या शेवटच्या आवर्तनाच्या वेळी यज्ञातून धुरकट रंगाच्या धुराऐवजी काळा धूर येऊ लागला. तेव्हा ‘अनिष्ट शक्ती जळून नष्ट होत आहेत’, असे मला वाटले.

नवरात्रीच्या काळात होणारी धर्महानी रोखा आणि ‘आदर्श नवरात्रोत्सव’ साजरा करण्यासाठी प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा !

‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या काळात देवीतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. नवरात्रीच्या निमित्ताने व्यापक धर्मप्रसार होण्यासाठी पुढील प्रयत्न करून देवीची कृपा संपादन करा.

दीपावलीच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे. पुढील पिढीला आतापासून घडवल्यास ही मुले हिंदु राष्ट्रातील सुजाण नागरिक बनतील !

प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात ख्रिस्त्यांच्या पोलीस ठाण्यांत तक्रारी

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.