साधकांनी भावजागृतीचा प्रयोग करतांना पंचज्ञानेद्रियांनी अनुभूती घेण्याचा प्रयत्न करावा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

‘संतांच्या वक्तव्यांचा कार्यकारणभाव काय असतो ?’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

आतापर्यंत घडलेल्या सर्व प्रसंगांचे चिंतन करतांना ‘संतांनी  आम्हा दोघींकडून साधना कशी करून घेतली ? आणि त्यांच्या वक्तव्यांचा काय कार्यकारणभाव होता ?’, हे लक्षात आले. ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी श्रीरामाचे भावपूर्ण चित्र काढून त्याच्या चरणी भक्ती अर्पण करणारी पुणे येथील कु. ईश्वरी दिपेंद्र रोडी (वय ११ वर्षे) !

श्रीरामाचा नामजप करत मी माझ्याकडे असलेल्या श्रीरामाच्या एका चित्राप्रमाणे चित्र काढले. ते चित्र काढून पूर्ण झाल्यावर मला वाटले, ‘श्रीरामाच्या कृपेविना मी इतके सुंदर चित्र काढू शकले नसते.

ब्रह्मोत्सवासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला बिल्ला एक मासाने काहीही बाह्य कारण नसतांना खराब होणे

आम्हाला डिसेंबरमध्येच ब्रह्मोत्सवासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला बिल्ला मिळाला होता. तेव्हा थंडी असल्याने मी तो बिल्ला ‘स्वेटर’वर लावला होता आणि पुढे मी तो स्वेटर १० दिवस वापरत होते.

अमित शहा गृह, तर राजनाथ सिंह यांचे संरक्षण खाते कायम !

केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात प्रमुख खाती ज्यांच्याकडे होती त्यांना तिच खाती पुन्हा देण्यात आली आहेत.

पालखी सोहळ्याच्या मुख्य समन्वयकपदी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची नियुक्ती !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारीचा पालखी सोहळा २९ आणि ३० जूनला पिंपरी-चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांसाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा आणि सुविधा पुरवल्या जातात.

आरक्षण न दिल्यास विधानसभा निवडणुका लढणारच ! – मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ‘आमरण उपोषणा’ला ८ जूनपासून प्रारंभ झाला. पोलिसांकडून या उपोषणाला अनुमती नाकारण्यात आली आहे; मात्र तरीही मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथे श्री मांगवीर बाबा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्याच्या मागणीसाठी ‘लहू प्रहार संघटने’ची निदर्शने !

जिल्ह्यातील शेंद्रा येथे असलेल्या श्री मांगवीर बाबा देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात यावा आणि श्री मांगवीर बाबा देवस्थान विकास प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी ‘लहू प्रहार संघटने’च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे ७ जून या दिवशी निदर्शने करण्यात आली.

श्रीमान योगी असलेल्या शिवरायांची साधना देशभक्तीची होती ! – भय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

छत्रपती शिवाजी महाराज हे एकमात्र राजा होते, ज्यांना ‘श्रीमान योगी’ म्हटले जाते. त्यांची साधना देशभक्तीची होती, तर मातृभूमीची भक्ती त्यांनी केली. कर्मशील, विवेक, चारित्र्य अशा अनेक गुणांचा समुच्चय त्यांच्यामध्ये आढळतो