ब्रह्मोत्सवासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला बिल्ला एक मासाने काहीही बाह्य कारण नसतांना खराब होणे

सौ. तनुश्री साहा

‘आम्हाला डिसेंबरमध्येच ब्रह्मोत्सवासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला बिल्ला मिळाला होता. तेव्हा थंडी असल्याने मी तो बिल्ला ‘स्वेटर’वर लावला होता आणि पुढे मी तो स्वेटर १० दिवस वापरत होते. नंतर थंडी न्यून झाल्यामुळे मी स्वेटरला लावलेला बिल्ला काढून तो साहित्याच्या कपाटात ठेवला. तो साधारण एक मास कपाटात होता. मध्यंतरीच्या काळात मी १५ दिवस बाहेरगावी गेले होते. परत आल्यावर चैतन्य मिळण्यासाठी बिल्ला काढला, तेव्हा ‘तो खराब झाला आहे’, असे माझ्या लक्षात आले. बिल्ला ठेवलेल्या ठिकाणी कपाटात कुठलाही द्रव पदार्थ किंवा पाणी नव्हते.’

– श्रीमती तनुश्री साहा, कोलकाता. (११.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक