सनातन धर्मीय संघटित झाल्यास धर्म बलवान होऊ शकतो ! – जगद्गुरु श्री श्री श्री विधुशेखर भारती महास्वामीजी महाराज, दक्षिणाम्नाय शृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर

या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातून देश आणि धर्म यांविषयी चिंतन होऊन योग्य निर्णय घेतले जावेत, यासाठी आम्ही भगवान नारायणाला स्मरून आशीर्वाद देत आहोत, तसेच या धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी सर्व संघटनांनाही आमचे आशीर्वाद आहेत.

देहू (पुणे) येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सप्ताहास प्रारंभ !

आषाढी वारीसाठी २८ जून या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव विशेष : हिंदु राष्ट्रासाठी हिंदु संघटन !

भारतातील गरीब आदिवासी लोकांना लक्ष्य करून त्यांचे धर्मांतर केले. वैचारिक आतंकवाद पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावर मात करण्यासाठी हिंदूंनी घराघरांत वेद, उपनिषद आणि गीता यांचा अभ्यास केला गेला पाहिजे.

पुणे शहरातील गुन्हा नोंद असलेल्या २३३ पिस्तूल परवानाधारकांना नोटीस !

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याजवळ अल्पवयीन मुलावर २२ जून या दिवशी गोळीबार करण्यात आला. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनुमती (परवाना) असलेल्या पिस्तूल (अग्नीशस्त्र) धारकांचा आढावा घेतला.

शिक्षकांच्या भ्रमणभाषमध्ये ‘नीट’ घोटाळ्याचे पुरावे आढळले

‘नीट यूजी परीक्षा घोटाळ्या’त लातूरचे संजय जाधव आणि जलीलखान पठाण या २ शिक्षकांनी ‘नीट’मध्ये अधिक गुण मिळवून देण्यासाठी धाराशिवमार्गे देहलीला पैसे पाठवल्याचे ‘आतंकवादविरोधी पथका’च्या (‘ए.टी.एस्.’च्या) प्राथमिक अन्वेषणातून पुढे आले आहे.

वाशी-तुर्भे लिंक रोडवरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी एक लेन बंद !

तुर्भे सेक्टर २१ नवी मुंबई महापालिका परिवहन आगाराकडून ठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या उड्डाणपुलाच्या ठिकाणचा एक भाग काही प्रमाणात निखळलेल्या अवस्थेत आहे.

मुंबईतील ऐतिहासिक बंदरे आणि गोदी यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !

‘बंदरांच्या विकासामुळे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आली’, असे नमूद करून गतकाळातील भारताच्या समृद्धीचे श्रेय देशाच्या विशाल सागरी वारशाला जाते.

राज्य सरकारने केलेल्या सर्वच मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे ! – खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

अटल सेतूला पडलेल्या भेगा पाहिल्यानंतर या सेतूच्या कामाचे नाही, तर राज्य सरकारने केलेल्या सर्व मोठ्या खर्चाच्या प्रकल्पांचे अन्वेषण व्हावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

पुसेसावळी (सातारा) दंगल आणि हत्या प्रकरणी ६ आठवड्यांत अहवाल द्या ! – मुंबई उच्च न्यायालय

भाजपचे नेते विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या भाषणांमुळे हिंदु-मुसलमान तणाव वाढल्याचा आरोप आहे.