
छत्रपती संभाजीनगर – सध्याचा ‘वक्फ कायदा’ हा धर्मविरोधी नसून तो राज्यघटनाविरोधी आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी हा कायदा अन्यायकारक आहे. त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ संजीव देशपांडे यांनी येथे केले. १८ नोव्हेंबर या दिवशी ‘अधिवक्ता परिषद देवगिरी प्रांतच्या हायकोर्ट युनिट’च्या वतीने आयोजित ‘वक्फ कायद्यातील स्वागतार्ह सुधारणा’, या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ‘हायकोर्ट युनिट’चे अध्यक्ष अधिवक्ता नितीन चौधरी, अधिवक्त्या संगीता बागूल उपस्थित होत्या.
ते पुढे म्हणाले, ‘‘जो अन्यायकारक आहे, तो मुळात कायदाच नसतो. सध्या लागू असलेल्या वक्फ कायद्याने जेवढी हानी इतर धर्मियांची होते, त्याहून अधिक हानी मुसलमान धर्मियांची होत आहे. त्यांच्या मिळकती ‘वक्फ बोर्डा’च्या कह्यात दिल्या जात आहेत.’’ कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिवक्ता श्रीकांत अदवंत म्हणाले की, ब्रिटीश काळातील प्रचलित ट्रस्ट कायद्याची मोडतोड करून वक्फ कायदा वर्ष १९९५ मध्ये अमलात आणला आहे.
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
फुलचंद रोकडे यांच्याकडून योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी वस्त्रदान आणि धोंडे जेवण
पिंपरी-चिंचवड बसस्थानकातील एका बसचे छत उखडले !
कराड येथे जप्त केलेले ‘सायलेन्सर’ आणि ‘प्रेशर हॉर्न’ ‘रोडरोलर’ने चिरडले !