परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.

उत्तर दिनाजपूर (बंगाल) येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची हत्या

येथे भाजपच्या युवा शाखेचे नेते मिथुन घोष यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येमागे तृणमूल काँग्रेस आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. ‘राजकीय उलथापालथ झाल्यावर मिथुन घोष यांची हत्या करणार्‍यांवर कारवाई केली जाईल’….

काश्मीरची स्थिती पालटण्यासाठी बिहारींकडे काश्मीरचे दायित्व द्या ! – माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची मागणी

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये परप्रांतियांवर आक्रमणे होत असून बिहारच्या २ कामगारांना ठार मारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मांझी यांनी हे विधान केले.

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

नफीस अहमद या धर्मांधाने एका शीख महिलेला लोखंडी सळीने घायाळ केले. त्यानंतर तिला ट्रकखाली फेकून चिरडून ठार मारले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कारागृहामध्ये रवानगी केली आहे.

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांप्रमाणे बंगालमध्येही हिंदू असुरक्षित !