गिरीश कुबेर यांच्या विरोधात पुण्यात भाजपकडून तक्रार प्रविष्ट

गिरीश कुबेर यांच्या विरोधात राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा पुणे शहरचे उपाध्यक्ष महेश पवळे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

उल्हासनगर येथे इमारत दुर्घटनांत गेल्या १५ दिवसांत १२ जणांचा मृत्यू !

उल्हासनगर येथे १५ दिवसांपूर्वी मोहिनी इमारतीचा सज्जा कोसळला. २८ मेच्या रात्री ९ वाजता साईशक्ती इमारतीचा सज्जा कोसळला. येथील इमारत दुर्घटनांत १५ दिवसांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला.

…तर यावर्षी प्रातिनिधिक वारीसुद्धा होणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाविषयी उपाययोजनाही अल्प पडत आहेत. अशीच स्थिती कायम राहिली, तर यावर्षी प्रातिनिधिक वारीसुद्धा होणार नाही, अशी शक्यता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

(म्हणे) ‘गडचिरोली जिल्ह्यातीलही मद्यबंदी उठली पाहिजे, ही जनभावना !’ – विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री

चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातीलही मद्यबंदी उठवण्यात यावी, ही येथील जनतेची भावना असून आपण स्वतःही याच मताचे आहोत’, असे वक्तव्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २९ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले.

जॉनरोज यांची वादग्रस्त भूमिका !

सर्व वैद्यकशाखांनी एकत्र येऊन भारतियांचे आरोग्य चांगले होण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. अशा वेळी ही द्वेषाची भाषा देशविरोधी आहे. त्यामुळेच जॉनरोज यांनीच प्रथम देशाची क्षमा मागितली पाहिजे !

केरळमधील साम्यवादी सरकारची ढोंगी धर्मनिरपेक्षता जाणा !

केरळ उच्च न्यायालयाने शिष्यवृत्तीत मुसलमान विद्यार्थांना ८० टक्के, तर लॅटीन कॅथोलिक अन् धर्मांतरित ख्रिस्ती यांना २० टक्के आरक्षण देण्याचा केरळ सरकारचा आदेश रहित केला.

लोकशाहीतील न्याययंत्रणेत हरवलेला न्याय !

सामान्य हिंदूंना खरेच वाटते की, न्यायमूर्ती बोबडे वाईट होते. वास्ताविक चित्र काय आहे, हे मांडण्याचा हा एक अत्यंत संक्षिप्त प्रयत्न करत आहे.

अशा भाषेत भारतातील पोलीस कधी बोलतात का ?

गुप्तचरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची झडती घेतली. काहीच सापडले नाही. तेव्हा गुप्तचरांचा प्रमुख अधिकारी सावरकर यांना म्हणाला, ‘‘क्षमा करा, चुकीच्या वार्तेमुळे तुम्हाला त्रास झाला.’’

तक्रारदारांना साहाय्य न करता त्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवणारे आणि गलथान कारभार करणारे पोलीस !

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.