हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाहीत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘गांधी यांनी हिंदूंची जितकी हानी हिंदु धर्मिय असतांना, तितकी ते ख्रिस्ती किंवा मुसलमान बनून करू शकले नसते’, असे हिंदूंना वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

देशात रहाणार्‍या एका समुदायाला ते देशभक्त असल्याचे सिद्ध करण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागते ! – असदुद्दीन ओवैसी

‘वन्दे मातरम्’ न म्हणणार्‍यांना, जिहादी आतंकवाद्यांना उघडपणे विरोध न करणार्‍यांना; बाबर, औरंबजेब यांची तळी उचलणार्‍यांना ‘हा देश आपला वाटतो’, ‘ते देशभक्त आहेत’, हे कसे मान्य करता येईल ?

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याला हिंदुरक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोपले !

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात पोलीस कठोर कारवाई करत नसल्याने हिंदूंच्या संघटनांवर हे पाऊल उचलण्याची वेळ येते. हे हिंदूंना अपेक्षित नाही !

 आंध्रप्रदेशमध्ये आणखी एका मंदिरातील मूर्तीची तोडफोड !

आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

केरळमधील हिंदु ऐक्य वेदीच्या ४ कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका !

‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर व्यवस्था उभारू पहाणार्‍या धर्मांधांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी हिंदूंवर कारवाई करणे, हे संतापजनक ! केरळमध्ये हिंदुद्वेषी, मुसलमानप्रेमी साम्यवाद्यांचे सरकार असल्याने हिंदूंवर विनाकारण कारवाई होते !

सर्वांना नाही, तर केवळ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस विनामूल्य मिळणार !

देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.

२६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करा अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – संदीप देशपांडे, मनसे

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत.

औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही विरोध

काँग्रेसने औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यास ठाम विरोध केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असणे, हा शिवरायांचा अपमान ! – शिवसेना

जे निजामी अवलादीचे आहेत, ते औरंग्यापुढे आजही गुडघे टेकत असतील, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे.

साटेली (दोडामार्ग) येथील श्री सातेरीदेवी, श्री शांतादुर्गादेवी, श्री देव पुरमार यांचा जत्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील साटेली येथील श्री देवी सातेरी, श्री देवी शांतादुर्गा आणि श्री देव पुरमार या देवतांचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी (३ जानेवारी २०२१) या दिवशी साजरा होत आहे.