छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक

या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या कथा वाचनाला अनुमती नाकारण्याची मागणी करणारी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळली !

काही दिवसांपूर्वीही अशाच प्रकारची याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ती न्यायालयाने फेटाळली होती. पुन्हा त्याच पद्धतीची याचिका प्रविष्ट करण्यात आली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

राहुल गांधी यांच्या भाषणात उल्लेख असलेल्या पुस्तकांची सूची सादर करण्याचा पुणे न्यायालयाचा आदेश !

‘इंग्लंड येथील एका कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती सांगत राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला’, असा दावा सात्यकी सावरकर यांनी केला असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावाही प्रविष्ट केला आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याकडून ‘द केरल स्टोरी’चे कौतुक !

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘द केरल स्टोरी’चे कौतुक करत बॉलीवूडला फटकारले आहे.

जयपूर (राजस्थान) येथे सरकारी अधिकार्‍याकडून बेहिशोबी संपत्ती जप्त

सरकारच्या योजना भवनाच्या तळघरामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या कपटात ठेवण्यात आलेली २ कोटी ३१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि १ किलो सोने सापडले आहे.

भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक व्हावे ! – रमेश बैस, राज्यपाल

२१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राज्यपालांच्या हस्ते मेजर कौस्तुभ राणे यांचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ देऊन मरणोत्तर सन्मान करण्यात आला.

त्रावणकोर देवास्वम् बोर्डकडून मंदिरांच्या परिसरात संघाच्या शाखा आयोजित करण्यावर पुन्हा बंदी !

त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे.

#Exclusive : शत्रूशी लढण्यासाठी तुमची संपर्कयंत्रणा आणि धोरण, हे आंतरराष्ट्रीय घडामोडींशी सुसंगत असणे आवश्यक ! – डॉ. जी.बी. हरीश, प्रसिद्ध लेखक, बेंगळुरू

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. आज भाग २.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राची मागणी भारतविरोधी !’-समाजवादी पक्षाचे स्वामी प्रसाद मौर्य

हिंदु राष्ट्राच्या मागणीला भारतविरोधी ठरवणारे राजकारणी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धोरणाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !